IND vs BAN 2nd ODI Result: रोहित शर्मा लढला, पण टीम इंडियाने सीरीज गमावली

IND vs BAN 2nd ODI Result: बांग्लादेशकडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी आहे.
ind vs ban
Image Credit source: AFP
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल |
Dec 07, 2022 | 8:07 PM
ढाका: दुसऱ्या वनडे मध्ये टीम इंडियाचा अवघ्या 5 रन्सनी पराभव झाला. टीम इंडियाने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत दिली. जखमी रोहित शर्मा अखेरपर्यंत मैदानावर उभा होता. त्याच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाच्या विजयाची आस निर्माण झाली होती. शेवटच्या चेंडूवर 6 रन्सची गरज होती. पण रोहितला षटकार मारता आला नाही. बांग्लादेशने विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 9 बाद 266 धावा केल्या. रोहितने 28 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकार होते.
मेहेदी हसन मिराज बांग्लादेशच्या विजयाचा हिरो
मेहेदी हसन मिराज बांग्लादेशच्या विजयाचा नायक आहे. तो आठव्या नंबरवर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने शानदार शतक ठोकलं. बांग्लादेशने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. बांग्लादेशने सलग दुसऱ्यांदा आपल्या देशात टीम इंडियाला वनडे सीरीजमध्ये हरवलं. याआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशने टीम इंडियाला 2-1 ने हरवलं होतं. सीरीजमधला तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी होईल. प्रतिष्ठेच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.