तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत उमेदवारी अर्जांच्या माघारीनतर आरवडे आणि चिंचणी ग्रामपंचायती बिनविरोध झाले तर २४ गावातील १८ सदस्य बिनविरोध झाले आहेत. माघारीनंतर २४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६५ व सदस्य पदासाठी ४५४ असे एकूण ५१९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर सरपंच पदासाठी १५५ तर सदस्य पदासाठी ८७२ असे एकूण १०२७ अर्ज दाखल झाले होते. चिंचणी गावातून सरपंच पदासाठी सर्वाधिक १३ अर्ज दाखले झाले होते. मणेराजुरी गावातून सदस्य पदासाठी सर्वाधिक ७४ अर्ज दाखल झाले होते.

छाननीवेळी सरपंच पदाचे नागाव निमणी आणि कुमठे येथील प्रत्येकी दोन आणि अंजनी येथील एक असे पाच अर्ज अवैध ठरले. सदस्य पदाचे नागाव निमणी येथील पाच, कुमठे येथील तीन, मतकुणकी येथील दोन व उपळावी येथील एक अर्ज अवैध ठरले होते. सरपंच पदाचे १५० व सदस्य पदाचे ८०६ व्यक्तिंचे ८६१ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.

बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चिंचणी आणि आरवडे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. इतर २४ गावातील सरपंच पदासाठीच्या ८३ आणि सदस्य पदासाठीच्या ३६१ व्यक्तींच्या ३२७ अर्जांची माघार झाली.

अर्ज माघारीनंतर २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी गावनिहाय अर्ज

अंजनी (४)(१७), आरवडे (बिनविरोध), बेंद्री (२)(११), भैरववाडी (२)(९), नागाव निमणी (२)(१८), पानमळेवाडी (२)(१३), सावर्डे (२)(२६), उपळावी (२)(२३), वायफळे (३)(२६), बलगवडे (२)(१८), खुजगाव (४)(१८), कुमठे (२)(२९), लिंब (२)(१४), नागेवाडी (२)(१५), निमणी (३)(१८), पुणदी (२)(१८), शिरगाव कवठे (२)(१७), वंजारवाडी (३)(१७), मणेराजुरी (३)(३५), मतकुणकी (३)(२१), बस्तवडे (६)(२९), वासुंबे (३)(३०), चिंचणी (बिनविरोध), कचरेवाडी (२)(१४), नेहरुनगर (२)(१७), योगेवाडी (५)(१९)